vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी*-जिल्हाधिकारी संतोष पाटील*

 

सातारा प्रतिनिधी बकरी ईद येत्या 28 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या बकरी ईद निमित्त होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीसाठी तात्पुरत्या कत्तल खान्यासाठी कुरेशी समाजाने शहरी भागात नगर पालिकाकडे व ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडे परवानगीचे अर्ज करावेत. तसेच बकरी ईद कायद्याचे पालन करून शांततेत साजरी करावी अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

बकरी ईद निमित्त प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीची बैठक शिवतेज हॉल येथे संपन्न झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे, यांच्यासह पशुसंर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

तात्पुरत्या कत्तल खाण्याला सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तात्पुरत्या कत्तलखाण्यासंदर्भात सर्व नगर पालिका, नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. त्यांना महराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 ची कत्तल खाण्यासाठी द्यावयाच्या सुविधांची माहिती द्यावाहतूक अधिनियम 1978 मधील नियम 47 अन्वये वाहतूक होणाऱ्या जनावरांचे वाहतुकीपुर्वी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात आरोग्य तपासणी करावी. सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांनी वाहतूक होणाऱ्या जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र द्यावे. ईद निमित्त उभारण्यात येणाऱ्या कत्तलखाण्यांना सर्व सहकार्य करावे. त्याचबरोबर कत्तल झाल्यानंतर त्याचा इतर लोकांना त्रास होणार नाही याचीही खबरदारी घ्यावी.

महाराष्ट्र शासनाने गायी, गायीची वासरे, वळू किंवा बैल या गोवंशीय प्राण्याचे रक्षणासाठी व उत्पादक म्हशी तसेच रेडे यांचे कत्तलीस निर्बंध घालण्यासाठी महराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 दि. 4 मार्च 2015 पासून लागू केला आहे याचीही पशुसंवर्धन विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही पोलीस अधीक्षक श्री पिंगळे यांनी दिल्या.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील अठरा नंबर प्लॅटफॉर्म सुमारे तीन महिन्यांसाठी बंद.

vishwatmaklokswamivarta

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार लयलूट …

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदासाठी  आरक्षण जाहीर

vishwatmaklokswamivarta

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

मुंबईत ज्यांचे स्वतःचे वा वडिलोपार्जित घर नाही आणि जे भाडयाने राहतात त्यांना दरमहा ५००० रूपये भाडे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयाच्या ठिकाणी उदा. पुणे, नागपूर, कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या स्वतःचे घर शहरात असलेल्या भाडेकरूंना ३००० रूपये देण्याची मागणी-ब्लॅक पँथर पक्षा ने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta