vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुकप्रदेश

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

            मुंबई, प्रतिनिधी महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावैभव राष्ट्रीयस्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकायन लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे हरियाणातील गुरुग्राम येथे 4 व 5 जून 2026 रोजी आयोजन करण्यात आले आहे

    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आणि ‘लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्या सहयोगाने हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे. गुरुग्राम येथील एसजीटी युनिव्हर्सिटीत 4 व 5 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. या लोकोत्सवामध्ये महाराष्ट्रातील विविध पारंपरिक; तसेच प्रयोगात्म लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोककला जतन व संवर्धनाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित लोककलावंत यात सहभागी होऊन पारंपरिक लोकनृत्य, लोकसंगीत, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, दिंडी, लोकनाट्य, आदिवासी लोककला; तसेच आधुनिक प्रयोगशील लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा, लोकसंवेदना आणि सामाजिक आशय या कलाविष्कारांतून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहेत.

‘लोकायन लोकोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा एक वैचारिक आणि कलात्मक उपक्रम ठरणार आहे. विविध कलाप्रकारांमधून भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता, सामाजिक समरसता आणि लोककलांचे जतन या मूल्यांचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोककला राष्ट्रीयस्तरावर सादर करून कलावंतांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला लोकपरंपरांशी जोडणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक बळकट करणे हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. गुरुग्राम येथील रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव या निमित्ताने घेता येणार आहे.या सांस्कृतिक महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोककला आणि लोकसंस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

000

संबंधित पोस्ट

30 खाटाच्या रुग्णालयांना आवाहन

एकल महिलांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार एकल महिलांना पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत व पात्र एकल महिला लाभार्थींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीती पाणी पातळीत सातत्याने वाढ,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला संभाव्य पूरस्थितीचा आढावा- यंत्रणांनी सज्ज राहण्याचे दिले आदेश

वारणा धरणात 28.15 टी.एम.सी. पाणीसाठा

वृद्धाश्रमातील वृद्धांना भोजनासाठी डायनींग टेबल दिले भेट *

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

vishwatmaklokswamivarta