vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

‘डाक अदालत’ चे ( दि.८जून रोजी) आयोजन; तक्रारी नोंदवण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-देशातील पोस्टल सेवा ही नागरिकांच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पोस्ट खाते नेहमीच ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचा आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असते. याचाच भाग म्हणून दि.८ जून २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.

सेवा देताना काही वेळा त्रुटींमुळे किंवा संवादामुळे ग्राहकांच्या तक्रारी निर्माण होतात. या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी ‘डाक अदालत’ घेण्याचे ठरवले आहे. या अदालतीमध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी थेट ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करतात.

छत्रपती संभाजीनगर क्षेत्राशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण गेल्या ६ आठवड्यांच्या आत झालेले नसेल आणि ग्राहकाला समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशाच तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाईल.विशेषत:टपाल वस्तू (पार्सल/पत्र),मनी ऑर्डर,बचत बँक खाते, प्रमाणपत्रे याचा समावेश आहे.तक्रारदारांनी आपल्या तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलांसह करणे आवश्यक आहे. यामध्ये मूळ तक्रार पाठवलेली तारीख, ज्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती त्यांचे नाव आणि हुद्दा इत्यादी गोष्टी स्पष्ट असाव्यात.

 श्री भगवान नागरगोजे, सहायक निदेशक डाकसेवा (ज शि), पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, छत्रपती संभाजीनगर,४३१००२. येथे सादर कराव्यात.

 तक्रारीच्या दोन प्रती (Copies) पाठवणे आवश्यक आहे. असे आवाहन प्रवर अधीक्षक, डाकघर ,छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जागेवरच निवड संधी’ या मोहिमेअंतर्गत रोजगाराची संधी;लातूर येथे 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या बांधकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

आदिशक्ती अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीग्रामस्तरावर १५ दिवसांत समित्या स्थापन करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबईतील वाहतूक सुलभ व सुरळीत होण्यासाठी मेट्रो आणि कोस्टलरोड सारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचे महत्त्वप्रकल्पांमध्ये सुरुवातीला आलेल्या समस्या, कायदेशीर व पर्यावरणीय परवाने, नागरिकांचे प्रश्न अशा अनेक आव्हानांवर नियोजनबद्ध तयारी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित दिवंगत बी.जी.देशमुख स्मृती व्याख्यानमालेत अश्विनी भिडे यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती….