vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे– राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,पातूर येथे मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नियमांचे काटेकोर पालन व्हावे– राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे,पातूर येथे मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी

अकोला, प्रतिनिधी : पातूर नगरपरिषद तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण निवडणूक यंत्रणा सक्षम, सज्ज आणि सतर्क ठेवावी. प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक तयारी व आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, न. प. प्रशासन सहआयुक्त विश्वनाथ वडजे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पातूर व अकोट नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळाचे नियोजन, तसेच आवश्यक साधनसामग्री यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी ग्रामपंचायत व इतर निवडणुकांसाठी आरक्षण सोडत, प्रशिक्षण प्रक्रिया आणि यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, आयुक्तांनी पातूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन मतदान केंद्रे व स्ट्रॉंगरूमची पाहणी केली. न. प. मराठी शाळा क्र. १ येथील मतदान केंद्राला त्यांनी दिली. पातूर येथे त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व निवडणूक प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले.

निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडता कामा नये. आचारसंहितेचे काटेकोर पालन करून निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्तांनी दिले.

०००

संबंधित पोस्ट

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंदणी-भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक ‘गोजातीय प्रजनन व नियमन’ विषयावर कार्यशाळा संपन्न