vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई उपनगरात अतिक्रमण निष्कासन मोहिमेत १४ एकर जमीन मोकळी

मुंबई उपनगरात अतिक्रमण निष्कासन मोहिमेत १४ एकर जमीन मोकळी..

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमणे निष्कासन मोहिम, जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या समन्वयातून सुरु केली आहे. कुर्ला तालुक्यामधील मानखुर्द येथील ११ एकर शासकीय जागा अतिक्रमणमुक्त करून मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द केल्यानंतर आता, या अतिक्रमण निष्कासन मोहीमेअंतर्गत ११ जून २०२६ रोजी, मौजे मानखुर्द, ता. कुर्ला येथील नगर भूमापन क्रमांक १/१ तसेच मंडाळे येथील ६/१ व खाडीलगत शासकीय जागेवरील व्यवसायिक वापरली जाणारी अनधिकृत २२० गोडाऊन/गाळे इ. निष्कासित करुन एकूण १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमण मुक्त केली

या मोहीमेमध्ये पोलीस उपायुक्त, परिमंडळ ६ समीर शेख यांनी सुरक्षा उपलब्ध करून दिली यामुळे निष्कासन मोहित यशस्वी पार पडली. निष्कासन मोहिम अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) चेंबूर, उपविभागीय अधिकारी (पूर्व उपनगरे), बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त (एम/पूर्व), तहसिलदार कुर्ला, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर भूमापन अधिकारी, चेंबूर व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली.

ही कारवाई शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाचे सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १५० कर्मचारी, महसूल विभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी, नगर भूमापन विभागाचे १० अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच अतिक्रमण हटविण्यासाठी ३ पोकलेन यंत्रे व ४ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. संबंधित जागा संरक्षित करुन शासनाच्या धोरणानुसार, शासकीय प्रकल्प/विभाग यांना देण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.

प्रशासनाच्या समन्वयातून आणि महसूल विभागाच्या प्रभावी कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन ताब्यात घेण्यात यश आले आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटवण्यासाठीही अशाच प्रकारची विशेष मोहीम तीव्र गतीने राबवली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत“मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी तेथील जनतेला दिल्या शुभेच्छा भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

vishwatmaklokswamivarta

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

vishwatmaklokswamivarta

घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव पूर्वतयारी बैठकआरोग्य, स्वच्छता, सुरक्षा उपलब्ध करुन द्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नद्यांचे खोलीकरण, गाळ काढण्याचे काम प्राधान्याने करा-पालकमंत्री ना. मकरंद पाटील· अतिवृष्टीग्रस्त भागाचे पंचनामे पूर्ण करा· दिवाळीआधी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत· जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न· प्रशासकीय मान्यता पूर्ण करा

vishwatmaklokswamivarta