vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

लोकशाही वाचविणाऱ्या सेनानींचे योगदान देश कदापी विसरू शकणार नाही आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा डाग” – भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त “विश्वास, विकास व जनकल्याण” या विषयावर प्रबुद्ध नागरी संमेलन तसेच २५ जून १९७५ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “काळा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीच्या रक्षणासाठी आणीबाणीच्या काळात संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लोकशाही सेनानी व ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रघुनाथ दीक्षित, अरुण उपाध्याय, बद्रीनाथ पठाडे, ॲड. विपुल देशपांडे, विजय कामड, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, नारायण पवार, धनराज काबलिये, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, अमोल कारंजेकर, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, “२५ जून १९७५ हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादून नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेतले, विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादले. त्या कठीण काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हजारो कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. अशा लोकशाही सेनानींचे योगदान देश कधीही विसरू शकत नाही.” “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, सुशासन आणि जनकल्याणाची नवी दिशा अनुभवली आहे. गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि समाजातील प्रत्येक घटकाला केंद्रस्थानी ठेवून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले

यावेळी मंडळाध्यक्ष महेश निकम, सुनील खरे, संजय डोंगरे, अमोल धानूरे, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 00000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

आंतरजातीय विवाहित दांपत्यांनीआर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घ्यावा- मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत झालेल्या कामांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या माहितीसाठी एक हजार गावांमध्ये एआयआधारित अर्लट यंत्रणा -वनमंत्री गणेश नाईक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक, २०२५’ ला मान्यता दिली.संसदेत ऑनलाइन गेमिंग विधेयक, 2025 मंजूर..

vishwatmaklokswamivarta