vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

२१ जुलै रोजी जालना येथे संविधानिक हक्कांसाठी मोर्चा; समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांचे आवाहन

 

जालना | प्रतिनिधी :

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार, दि. २१ जुलै २०२६ रोजी जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या **‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा’**मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ढोर समाज संघटना, जालना जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सकाळी प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकणार आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संविधानिक आणि लोकशाही मार्गाने समाजाची भूमिका शासनापर्यंत पोहोचविणे हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे.

मोर्चात जालना जिल्ह्यातील सर्व ढोर समाज बांधव, माता-भगिनी, युवक-युवती तसेच समाजहिताची जाणीव असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गाव, वस्ती आणि परिसरातून जास्तीत जास्त उपस्थिती राहून समाजाची एकजूट दाखवावी, असेही संघटनेने नमूद केले आहे.

मोर्चा शांततापूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत संविधानिक मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन करत, सर्वांनी वेळेत उपस्थित राहून संघर्ष मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गणेश चांदोडे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मराठी न शिकविणाऱ्या शाळांवर दंडासह मान्यता रद्द करण्याची कारवाई- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समता, न्यायाचे राज्य प्रस्थापित केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया कायद्यानुसार;नागरिकांना आक्षेप नोंदविण्याची संधी– राज्यमंत्री माधुरी मिसाळ