vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोणावळा कारला लेणी परिसरातील येथील  एकवीरा देवीची पालखी सोहळा अचानक झाला भक्तांवर मधमाशांचा हल्ला…

लोणावळा कारला लेणी परिसरातील येथील  एकवीरा देवीची पालखी सोहळा अचानक झाला भक्तांवर मधमाशांचा हल्ला…

 

राज्य प्रतिनिधी

लोणावळ्यातील एकवीरा गडावर नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. एकवीरा देवीचे स्थान असलेल्या कार्ला गडावर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी गर्दी केली होती. मात्र, काही हुल्लडबाज भाविकांमुळं इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. कलरफुल फटाके फोडल्याने एकविरा देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला.

लोणावळ्यातील एकवीरा गडावर आज हुल्लडबाज भाविकांनी मंदिराजवळ कलर धुराचे फटाके फोडल्यामुळं मधमाश्यांच्या पोळाला इजा पोहचवली. त्यानंतर मधमाश्यांनी भविकांवर हल्ला करत चावा घेतला. यात अनेक भाविकांची पळापळ झाली तर बहुतेक भाविकांना मधमाशांनी चावा घेऊन जखमी केले आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती. त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले त्याचा फटका बाकीच्या भक्तांना ही बसला आहे. मात्र गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. एकवीरा गडावर फटाका बंदी कायम असावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जखमी भाविकांना तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर तातडीने उपचार करुन काहींना सोडून देण्यात आलं आहे. तर, ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना काही काळ निरिक्षणाखाली ठेवून मग डिस्चार्च देण्यात येणार आहे. प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला,जत्रेवेळी पूजा करताना झालेल्या प्रचंड धुरामुळे मधमाश्यांनी मोठा हल्ला केल्याची अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंगराचेंगरीची घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळं अशा संवेदनशील ठिकाणी जाताना भाविकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

संबंधित पोस्ट

रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत – सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी रुग्णालयात जाऊन दिला धनादेश

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव बनले विद्यार्थ्यांचे सारथीपहिल्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत..

समाधान समारोह 2026 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयातील विशेष लोकअदालत 21, 22 व 23 ऑगस्टला- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- सहभागासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मे 2026

ग्रंथमहोत्सव’चे रुपांतर आनंदसोहळयात व्हावे-पालकमंत्री संजय शिरसाट‘ग्रंथ महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

डिजिटल शिक्षणाचे धोरण स्विकारणे काळाची गरज- प्रा. राम शिंदे