vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी करणार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी करणार…

-: जम्मू प्रदेशात संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नवीन जम्मू रेल्वे विभागाचे करणार उद्घाटन) तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे पंतप्रधान करणार उद्घाटन,ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पंतप्रधानांच्या हस्ते होणार पायाभरणी:-

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करणार आहेत.

पठाणकोट – जम्मू – उधमपूर – श्रीनगर – बारामुल्ला, भोगपूर सिरवाल – पठाणकोट, बटाला – पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर या खंडांचा समावेश असलेल्या 742.1 किमी लांबीच्या जम्मू रेल्वे विभागाच्या निर्मितीमुळे जम्मू आणि काश्मीर तसेच आसपासच्या प्रदेशांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सोबतच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे सेवेची पूर्तता होऊन या भागाचा भारताच्या इतर भागांशी संपर्कही सुधारेल. ही सेवा सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल.

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानक सुमारे 413 कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या तरतुदीसह नवीन कोचिंग टर्मिनल म्हणून विकसित केले गेले आहे. हे पर्यावरणपूरक टर्मिनल उत्तम प्रवासी सुविधा प्रदान करत सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचिगुडा यांसारख्या शहरातील विद्यमान कोचिंग टर्मिनल्सवरील गर्दी कमी करण्यासाठी मदत करेल.

याच कार्यक्रमात, पंतप्रधान ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणीही करतील. यामुळे ओदिशा, आंध्र प्रदेश आणि जवळपासच्या भागात संपर्क सुधारेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल

0000000

संबंधित पोस्ट

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे पल्स परिषदेतील चर्चासत्रात सहभागी तज्ञांचे मत

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावा

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

नवी मुंबई महानगरपालिकेचा 6704.43 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महासभेत सादर-स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील यांनी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला अर्थसंकल्प…

आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते उद्घाटन

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta