vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी करणार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी विविध रेल्वे प्रकल्पांचे  उद्घाटन आणि पायाभरणी करणार…

-: जम्मू प्रदेशात संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधान नवीन जम्मू रेल्वे विभागाचे करणार उद्घाटन) तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे पंतप्रधान करणार उद्घाटन,ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पंतप्रधानांच्या हस्ते होणार पायाभरणी:-

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.जम्मू प्रदेशातील संपर्क सुविधेला अधिक चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटनही केले जाणार आहे. यासोबतच पंतप्रधान, तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन तर ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी करणार आहेत.

पठाणकोट – जम्मू – उधमपूर – श्रीनगर – बारामुल्ला, भोगपूर सिरवाल – पठाणकोट, बटाला – पठाणकोट आणि पठाणकोट ते जोगिंदर नगर या खंडांचा समावेश असलेल्या 742.1 किमी लांबीच्या जम्मू रेल्वे विभागाच्या निर्मितीमुळे जम्मू आणि काश्मीर तसेच आसपासच्या प्रदेशांना यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल, सोबतच दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे सेवेची पूर्तता होऊन या भागाचा भारताच्या इतर भागांशी संपर्कही सुधारेल. ही सेवा सुरू झाल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांचा विकास होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल.

तेलंगणातील मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानक सुमारे 413 कोटी रुपये खर्च करून दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या तरतुदीसह नवीन कोचिंग टर्मिनल म्हणून विकसित केले गेले आहे. हे पर्यावरणपूरक टर्मिनल उत्तम प्रवासी सुविधा प्रदान करत सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचिगुडा यांसारख्या शहरातील विद्यमान कोचिंग टर्मिनल्सवरील गर्दी कमी करण्यासाठी मदत करेल.

याच कार्यक्रमात, पंतप्रधान ईस्ट कोस्ट रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणीही करतील. यामुळे ओदिशा, आंध्र प्रदेश आणि जवळपासच्या भागात संपर्क सुधारेल आणि या क्षेत्राचा सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकास होईल

0000000

संबंधित पोस्ट

भाजपा सदस्य नोंदणी अभियानांतर्गत जालना जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक,मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसत्ता वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती

मुंबई शहर व उपनगरात म्हाडाच्या जागांवरील अनधिकृत बांधकाम;चौकशी करून कारवाई होणार- मंत्री उदय सामंत