vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

तंबाखू मुक्तीसाठी दि.१५ पासून विशेष अभियान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

तंबाखू मुक्तीसाठी दि.१५ पासून विशेष अभियान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर,:- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी युवा पिढी जात आहे. हे वेळीच रोखण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक असून त्यासाठी जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय व सर्व कार्यालयात विशेष अभियान येत्या १५ तारखेपासून राबवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

     राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हास्तरीय समन्वय सनियंत्रण समितीचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, डॉ. किशोर महाले. डॉ. जगदीश वठार, डॉ. मनिषा भोंडळ, उप प्रादेशीक परिवहन अधिकारी मनिष दौंड तसेच अन्न औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ दरम्यान ४३६ व्यक्तिंवर कारवाई करुन ८५ हजार ८३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.

     जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की. तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन ही भविष्यकाळात तरुणाईला व्यसनांच्या विळख्यात ओढते. त्याविरोधात प्रभावी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या दि.१५ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सकाळी १० वा. तंबाखुच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. तसेच दि.१६ रोजी सर्व महाविद्यालयात तर दि.१७ रोजी सर्व कार्यालयांमध्ये तंबाखुच्या दुष्परिणामांबाबत माहिती द्यावी. तसेच यासंदर्भात करण्यात येणाऱ्या कारवाईचे प्रमाण वाढवावे. जिल्ह्यात तंबाखुचे सेवन कमी होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करावे,असे निर्देश त्यांनी दिले.०००००

संबंधित पोस्ट

स्वतः चे घर स्वतः चे ताब्यात “या मोहिमे अंतर्गत२५ हजार घरांचे बांधकाम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे निर्देश.. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून जिल्हा परिषदेकडील योजनांचा आढावा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक यांची उपस्थिती

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात.. सर्वजण सुखरूप असल्याची माहिती

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

आम आदमी पार्टीचे माजी मत्री सत्येंद्र जैन यांना तरुंगात मसाज,

vishwatmaklokswamivarta

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

vishwatmaklokswamivarta