vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहनांच्या संख्येसोबतच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येमुळे सध्या असलेल्या परिवहन सेवेला मर्यादा येत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये कोणत्या मार्गांवर कोणती परिवहन सेवा उपलब्ध करून देता येईल, याबाबत विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्त वर्दळ आहे, अशा ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. यंत्रणांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवांचे पर्याय निर्माण करावे, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या दालनात वॉटर टॅक्सी, रोप वे, पॉड टॅक्सी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला नगरविकास विभागाचे अधिकारी मेरी टाईम बोर्डाचे अधिकारी, परिवहन आयुक्त एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

परिवहन विभागाअंतर्गत रोप वे या नवीन परिवहन सेवेच्या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव करण्याच्या सूचना देत परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, रोप वे निर्माण करण्याक‍रिता नवीन यंत्रणा निर्माण करावी लागेल. सध्या रोप वे निर्माण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी नवीन नियम तयार करावे. पार्किंगची मोठी समस्या मोठ्या शहरांमध्ये आहे. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई महागनर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने भूमीगत पार्किंग प्लाझा तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 

भूमीगत पार्किंग प्लाझा ठिकाणी व्यावसायिक मॉल असावे. पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. वांद्रे पूर्व ते कुर्ला दरम्यान 8.8 किलोमीटर अंतराची ही सेवा असून यामध्ये 38 स्थानके असणार आहे. त्यानुसार कामाचे नियोजन करण्याचे निर्देशही मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले

 

संबंधित पोस्ट

वडिलांकडील कोणत्याही व्यक्तीचं जात प्रमाणपत्र सामाजिक स्थिती समजण्यासाठी ग्राह्य – हायकोर्ट

आर्थिक बाबी, खर्चावर असणार करडी नजर-केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांकडून कामकाजाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

न्यायमूर्ती उदय उमेश ललित भारताचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त

मुंबईत: 14 ते 15 मार्चला वरळी, दादरमध्ये पाणीकपात होणार, लाइनच्या दुरुस्तीच्या कामामुळे 18 तास पाणीपुरवठा राहणार विस्कळीत…

vishwatmaklokswamivarta

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे जे रूग्णालयात घेतलं अंतिम दर्शन…

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करा**- पालकमंत्री शंभूराज देसाई*