vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात अहिल्यानगर पाणीपुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सदानंद दाते, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता राम लोलपोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात. समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणीपुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी. जे ठेकेदार किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

पाणीपुरवठा योजना ही ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचा आढावा-विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप आणि वसईसह देशभरात ६७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन !गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून समाजात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील व्हा ! – हिंदु जनजागृती समिती

आज 27 डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन येथे “स्वामित्व” योजनेंतर्गत गावठाण भूमापन सनद वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र  राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta

कायदे में रहेंगे तो फायदे में रहेंगे; बागेश्वर धाम चे प्रमुख धीरेंद्र शास्त्री बाबांची आता नियमाची भाषा करत असल्याची चर्चा

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात 12 एप्रिलपर्यंत यलो अलर्ट,विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन