vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर काय म्हणाले ते पहा वादग्रस्त विधान..

 

राज्य प्रतिनिधी –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रयागराज महाकुंभवर वादग्रस्त विधान केले आहे. मौनी अमावस्येला महाकुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीवर टीका करताना त्यांनी ‘महाकुंभ आता मृत्युच्या कुंभात बदलला’, असे म्हटले आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला

महाकुंभात व्हीआयपींना सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. पण गरिबांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाकुंभात येणाऱ्या भाविकांना सुविधा नाकारल्या जात आहेत. महाकुंभात भाविकांची गर्दी, प्रयागराज संगम स्टेशन बंद होणे आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी यावरून त्यांनी योगी सरकारवर कडाडून टीका केली त्यांनी सरकारवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की महाकुंभ आता मृत्युकुंभात रूपांतरित झाला आहे. व्हीआयपी लोकांना सुविधा पुरवल्या जात आहेत. परंतु सर्वसामान्यांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. चेंगराचेंगरीत झालेल्या मृत्यूंनंतर मृतदेह शवविच्छेदन न करता बंगालला पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या महाशिवरात्रीला महा कुंभाच्या स्नानाचा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आता गर्दी ही वाढू लागली आहे त्याला नियंत्रित करण्याचे काम उत्तर प्रदेश सरकारही करू लागली आहे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणतेही अनुसूचित दुर्घटना घडू नये याचीही सतर्कता यावेळी घेण्यात येत आहे असल्याचे प्रशासनाकडून कळते.

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र: मोदी आज मोठी घोषणा करण्याची शक्यता, मास्क- बूस्टर डोसबाबत महत्वाचा निर्णय 

शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक

मुंबईतील मालाड मध्ये टिपू सुलतान, मैदाना बाहेर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात वातावरण बिघडणार यावर क** कारवाई करण्याचा इशारा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूरकरांना शांततेचे आवाहन