vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मप्रदेश

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

ज्यांच्याकडे कन्यारत्न आहे त्याला कशाही कमी नाही-राहुल महाराज जोशीहभप प्रा. उध्दव महाराज वाघमारे यांचे आज हरिकिर्तन…

जालना/प्रतिनिधी,ज्यांच्याकडे कन्यारत्न जन्माला आलेले आहे, त्याला कशाही कमी भासत नाही. म्हणतात ना पहिली बेटी और धन की पेटी… असा हितोपदेश हभप राहुल महाराज जोशी यांनी येथे बोलतांना दिला.

श्री. जोशी महाराज सहकार बँक कॉलनीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या भागवत कथेचे पाचवे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, पहिली बेटी ही खरोखरच धन की पेटी असते. मुलगी जन्माला आली की आपण बँक बँलन्स वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच म्हटले की, पहिली बेटी और धन की पेटी! श्रीकृष्ण जन्माचे गोडवे आज श्री. जोशी महाराजांनी गायिले. यावेळी त्यांनी पाळणा आणि भजनं देखील गायिले.

कीर्तन सेवेत आज हभप श्री राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी जग्तगुरु संत तुकाराम महाराजांच्या अंभगावर निरुपन केले. भक्ती ते नमन । वैराग्य तो त्याग॥ ब्रम्ही भोग, ब्रम्हा तनु, देहाचे निरासने पाहिजे या ंठाया, माझी ऐसी काया॥ या अभंगावर निरुपन करतांना ते म्हणाले की, साधक भक्ती करतो, त्याच्या सेवेसाठी आहे म्हणून! भक्ती म्हणजे नमन! अर्थात भक्ती ही नम्रता आहे म्हणून ती सर्वश्रेष्ठ मानली आहे. संतांची दृष्टी सुध्दा अशीच होती. नम्रता हा भाव प्रत्येकांच्या ठायी- ठायी असावा, असेही ते म्हणाले.

यावेळी विश्वस्त मंडळचे सचिव श्री संपतराव पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी व कॉलनी सर्व भाविक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

जिल्हा पीसीपीएनडीटी सल्लागार समितीची बैठक गर्भपात-सोनोग्राफी केंद्र,गर्भपात गोळ्यांच्या विक्रीची तपासणी करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

महाराष्ट्रातील चार शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ जाहीर

दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांन शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा ही होणारच. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जिल्हा माहिती कार्यालयाचा चित्ररथन्या.रविंद्र घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना

नीट’ परीक्षा सुरळीत…

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार