vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

जालना, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी सन 2024-25 वर्षाकरिता दिलेल्या 628 कर्ज मंजुरीच्या उद्दिष्टापैकी जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाचे 1194 कर्ज प्रस्ताव बँकेकडे शिफारस करण्यात आले त्यात 263 कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिलेली आहे. तसेच जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयाचे 426 कर्ज प्रस्ताव बँकांकडे शिफारस करण्यात आले होते. यामध्ये 62 कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिलेली आहे, असे एकूण 325 कर्ज मंजुरीचे (51.75%) उद्दिष्ट साध्य झाले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी दिली आहे.

सदर योजना अंतर्गत अनुसूचित जातीच्या 40, अनुसूचित जमातीच्या 4, इतर मागास प्रवर्गातील 115 व खुल्या प्रवर्गातील 166 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले आहे. तसेच 197 पुरुषांना व 128 महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील 230 व शहरी भागातील 95 लाभार्थ्यांना सदर योजनेत कर्ज मंजूर झाले आहे. कर्ज मंजुरीचे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया (70), महाराष्ट्र ग्रामीण बँक (63), बँक ऑफ महाराष्ट्र (45), व कोटक महिंद्रा बँक (34) या बँकांचे सहकार्य लाभले आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त 1 हजार 300 प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्तीसाठी ग्रामीण व शहरी तरुणांनी जास्तीत जास्त अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर (www.maha-cmegp.gov.in) ऑनलाईन पद्धतीने भरावेत तसेच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी अर्ज छाननी करून संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावांना त्वरित कर्ज मंजुरी देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी राज्याची महत्वाकांक्षी अशी सर्वसमावेशक योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.

-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

सेवाकर्मी पुरस्कार” कार्यक्रमात जिल्हा परिषद ठाणेची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये स्थान – १०० पैकी ८० गुणांकन…

vishwatmaklokswamivarta

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

राज्यात प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘विशेष बाल पोलीस पथक’ अनिवार्य,बालहक्क संरक्षण आयोगाच्या वैधानिक सूचना; वाढत्या गुन्ह्यांवर कठोर पाऊलराज्यात अल्पवयीन मुला-मुलींसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ : आयोगाचे सदस्य डॉ. संजय लाखेपाटील यांची माहिती 

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला जिल्ह्याअंतर्गत सुरक्षेचा आढावा…