vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

 

प्रतिनिधी(जिल्हा परिषद, ठाणे): ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येतो. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश अंकुश फडतरे यांची निवड राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फडतरे यांनी जिल्हा परिषद सातारा येथे काम करत असताना कोविड काळात उत्कृष्ट कामकाज केले आहे. ग्रामपंचायत भवन बांधकाम, पाणी पुरवठा योजना, उपजीविका अभियान, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, पथदिवे योजना, विविध इमारत बांधकाम योजना, रोजगार हमी योजना, तसेच पंचायत राज यंत्रणेच्या डिजिटलायझेशन अशा अनेक विभागांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या पारदर्शक प्रशासकीय प्रक्रियेतील योगदान, व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

    या पुरस्कारामार्फत त्यांचे सकारात्मक प्रशासन, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लोकाभिमुख कामगिरी यांची शासन स्तरावरून दखल घेण्यात आली आहे. हा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रामाणिकता, काटेकोर नियोजन आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानला जातो.

     हा गौरव कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. अविनाश फडतरे यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेतील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

000000000–

संबंधित पोस्ट

मुंब्रा गोळीबार प्रकरणी आरोपी अटकेत, पुढील तपास प्रगतीपथावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा कामकाज

संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे दोन दिवसीय जालना ग्रंथोत्सवाचे आयोजन 10 व 11 मार्चला ग्रंथ प्रदर्शन, विक्री, साहित्यिक मेळावा, परिसंवाद,       सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च उपक्रमांची राहणार रेलच· महोत्सवात पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री मुख्य आकर्षण

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

vishwatmaklokswamivarta

व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta