vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

 संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

           सांगली, द प्रतिनिधी : संरक्षित शेतीमध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना अशा दोन लाभाच्या योजना आहेत. यामध्ये फळ पिकांकरिता फळांना/फळांच्या घडांना कव्हर व तण नियंत्रक आच्छादन हे दोन घटक नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

अनुसूचित क्षेत्रासाठी 15 टक्के अतिरीक्त खर्चाचा मापदंड देय असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 उतारा, 8-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र ,चतु:सीमा नकाशा आदि कागदपत्रे आवश्यक आहेवातावरण बदलाच्या पार्श्वभूमिवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करून उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे निर्यातयोग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने उत्पादन घेता येते. त्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.खर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा व क्षेत्र मर्यादा पुढीलप्रमाणे –

अ.क्र.बाब प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड

अपेक्षित खर्च 50% देय अनुदान क्षेत्र मर्या.

1हरितगृह (OVPH) रु.1000 ते 1200

5 गुंठे – 6.0 लाख-10 गुंठे – 10.58 लाख

20गुंठे – 20.80 लाख-25 गुंठे – 25.00 लाख

5 गुंठे- 3.0 लाख,10 गुंठे- 5.38 लाख

20 गुंठे- 10.40 लाख 25 गुंठे- 12.50 लाख

500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.हरितगृह (CCPH)रु.1500 ते 18005 गुंठे – 9.0 लाख

10 गुंठे – 16.12 लाख 20गुंठे – 31.20 लाख

25 गुंठे -37.50 लाख5 गुंठे- 4.50 लाख 10 गुंठे- 8.06 लाख 20गुंठे- 15.60 लाख

25 गुंठे- 18.75 लाख 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

2-शेडनेटगृहरु.710 5 गुंठे- 3.55 लाख10 गुंठे- 7.18 हरितगृह (OVPH)रु.1000 ते 1200 5 गुंठे – 6.0 लाख10 गुंठे – 10.58 लाख20गुंठे – 20.80 लाख 25 गुंठे – 25.00 लाख 5 गुंठे- 3.0 लाख10 गुंठे- 5.38 लाख

20 गुंठे- 10.40 लाख 25 गुंठे- 12.50 लाख 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी. हरितगृह (CCPH)रु.1500 ते 1800 5 गुंठे – 9.0 लाख 10 गुंठे – 16.12 लाख20गुंठे – 31.20 लाख

25 गुंठे -37.50 लाख5 गुंठे- 4.50 लाख 10 गुंठे- 8.06 लाख 20गुंठे- 15.60 लाख 25 गुंठे- 18.75 लाख 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.ð

2,शेडनेटगृहरु.710 5 गुंठे- 3.55 लाख10 गुंठे- 7.18 लाख 20गुंठे-14.76 लाख25 गुंठे-17.75 लाख 5 गुंठे- 1.77 लाख 10 गुंठे- 3.59 ला 20गुंठे-7.38 लाख 25 गुंठे-8.87 लाख500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

3प्लास्टिक मल्चिंगरु.4.0,४०००० प्रति हे.

२०००० प्रति हे.जास्तीत जास्त 2 हे. नव्याने समाविष्ट घघट

Db-फळ पिकांकरिता फळांना/ फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover)रु.5.0रु . 50000/हेरु . 25000/हेजास्तीत जास्त 2 हे.

5तण नियंत्रक आच्छादन(Weed Mat)रु . 50.00रु . 200000 / एकररु . 100000 / एकर जास्तीत जास्त 4000 चौ.मी.योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ http://krishi.maharashtra.gov.in किंवा नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

 

00000

संबंधित पोस्ट

हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. विरोधी पक्षनेते भाजपा देवेंद्र फडणवीस

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सिल्लोड येथे सोमवार (दि.७) पासून; १० जिल्ह्यातील ४०० खेळाडूंचा सहभाग

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न,मान्सूनपुर्व सर्व कामे संबधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

अमृत” च्या माध्यमातून खुल्याप्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींचा सर्वांगिण विकास

वातावरणीय कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद ; शेतकऱ्यांनी चिंता करु नये, शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

vishwatmaklokswamivarta