vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

१९३५ वर्ष पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

१९३५ वर्ष  पुरातन पार्श्वनाथ जैन मंदिर  पालिकेने तोडल्याने त्यांच्या  विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज यांचा आज मोर्चा…

मुंबई: प्रतिनिधी १९३५ साली बांधकाम केलेले १०८ पार्श्वनाथ जैन मंदिर मुंबई महानगर पालिकेने तोडल्याने पालिके विरोधात अखिल भारतीय सकल जैन समाज संतप्त झाला असून, सर्व जैन समाजाच्या वतीने विलेपार्ले ते अंधेरी येथील के. एल महानगरपालिका पर्यंत आंदोलन करणार आज मोर्चा काढून निषेध जाहीर करणार असल्याची माहिती जैन समाजामार्फत देण्यात आली आहे

[ याबाबत  प्रवीण जैन यांनी सांगितले की, “अहिंसक आणि शांतताप्रिय जैन समाजाच्या श्रद्धास्थानांवर प्रशासनाने जाणूनबुजून केलेल्या कारवाईचा आम्ही तीव्र जाहीर विरोध करतो. ही केवळ मुंबईतील नव्हे तर संपूर्ण देशातील जैन समाजाच्या श्रद्धेवर आघात आहे असे अनिल शाह यांनी सांगितले.समाजाने संपूर्ण देशभर या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला असून, पुढील काळात अहिंसक आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी पीयुष शाह,राजेश जैन,विकास अच्या, खुशालभाई शाह, भरत बाफना

राष्ट्रीय अध्यक्ष नवरत्न परिवार संस्थापक आचार्य श्री विश्वरत्नसागर सूरिश्वरजी महाराज उपस्थित होते. न्यायालयाने याबाबत समाजाच्या व मंदिराच्या बाजूने भूमिका घेतली असतानाही पालिका मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे शनिवारी होत असलेल्या या जैन आक्रोश आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवाने सामील व्हावे असे आवाहन केले आहे. या आंदोलनात देशभरातील साधू संत राजकीय नेते सहभागी होणार आहेत.

संबंधित पोस्ट

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

संविधान जागृती प्रश्नमंजुषा’ उपक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

२९ जानेवारी 📰 भारतीय वृत्तपत्र दिवस…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली