जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी“टेक वारी” उपक्रमाचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण संपन्न..
ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाकडून दि.5 ते 9 मे 2025 या कालावधीत “टेक वारी” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यानुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज त्याचे थेट प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार रेवण लेंभे, उज्वला भगत, प्रदीप कुडाळ, अमोल कदम आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांमधील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.