vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक! पाकिस्तानी अतिरेक्यांवरील कारवाई: हिंदू समाजाच्याअस्मितेचा निर्णायक प्रतिशोध! – सनातन संस्था

 

मुंबई प्रतिनिधी “भारतीय सैन्यदलाने काल रात्री पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राइक करून ती सर्व तळे उध्वस्त केली आहेत. ही केवळ एक सैनिकी कारवाई नव्हे, तर देशाच्या अस्मितेचा, सुरक्षिततेचा आणि आत्मगौरवाचा बुलंद शंखनाद आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी केले.

   ते पुढे म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे 26 निरपराध हिंदू पर्यटकांची जी निर्घृण हत्या करण्यात आली, तो हल्ला केवळ काही व्यक्तींवर नव्हता. तो हल्ला संपूर्ण हिंदू समाजावर होता, भारताच्या संस्कृतीवर होता. या क्रौर्याचा जो बदला भारतीय सैन्याने घेतला आहे, तो प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या हृदयाला समाधान देणारा आहे.

   सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक कारवाईचे आम्ही मन:पूर्वक स्वागत करतो. हे केवळ सूड नव्हे, ही हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी घेतलेली धाडसी पावले आहेत.

   भारतातील हिंदू आता जागा झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मागणीची दखल घेऊन सरकारनेही चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला दिले आहे. आता जर पाकिस्तानने वेगळी आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना यापेक्षा अधिक कठोर उत्तर मिळेल, हे भारतीय लष्कर आजच्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

    ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ ही केवळ घोषणा नाही. ती हिंदू समाजावरील अन्याविरुद्धचा हिंदूंच्या एकजुटीचा हुंकार आहे. संपूर्ण हिंदू समाज हा भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे. श्री. अभय वर्तक,प्रवक्ता, सनातन संस्था

,000000

संबंधित पोस्ट

मॉडेल सोलर व्हिलेज” साठी जिल्ह्यात १५ गावात होणार स्पर्धा – जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील-१ कोटी रूपयाचे केंद्रीय अर्थ सहाय्य मिळणार

नमुंमपाच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कार्यात कापडी पिशव्या वितरण करुन स्टेट बँक ऑफ इंडियाचा सहभाग*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची पाहणी

नारायण मेघाजी लोखंडे सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२५’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न कामगार कायद्यातील सुधारणांमुळे कामगारांबरोबरच उद्योगांनाही फायदा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

तिरूपती मंदिरा मध्ये वैकुंठ द्वारका चे दर्शन घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या मध्ये टोकन देताना झालेल्या चेंगराचेंगरी मध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती….

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन, आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल-   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta