vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

   लातूर प्रतिनिधी-  अचानकपणे विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाण, इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या.

         रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ वाऱ्या होऊन अवकाळी जोरदार पाऊस झाला. गारांचाही सडाका पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, पोल तुटून पडले, डिपी उध्वस्त झाल्या, पत्रे उडाली, गव्हाण येथे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले, इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला. सदरील नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, अभिषेक अकनगिरे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी होते.

 वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे उडून घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्याचे नुकसान झालेल्या गव्हाण येथील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली. त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी. इंदरठाणा येथील मयत शेतगडी गुणाजी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आ कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावेळी गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, कृषी अधिकारी नितीन कांबळे, मराविमचे उप अभियंता काळे, मंडल निरीक्षक एस ए गायकवाड, तलाठी डी आर मोरे, त्याचबरोबर गव्हाण इंद्रठाणा परिसरातील वाजीद शेख, शिवमूर्ती उरगुंडे, बाळू कटके, परमेश्वर जाधव, दिनकर राठोड, पृथ्वीराज उरगुंडे, उज्ज्वल कांबळे, उत्तम राठोड, गुणवंत जोगदंड, बालासाहेब माने, देवानंद शिंदे, बालासाहेब बरीदे, सुभाष रायनूळे, गणपत पवार, काशीराम पवार, राम बरीदे, जगनाथ पवार, भारत वाघमारे, जनार्धन पवार, बळीराम बरीदे, विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने होते.

संबंधित पोस्ट

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज,नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पाच वर्षांच्या  चिमुकलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्‍न मार्गी लावू; ‘दादांचा वादा’प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्यवतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन..

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य- अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ· सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…