vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

   लातूर प्रतिनिधी-  अचानकपणे विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाण, इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या.

         रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ वाऱ्या होऊन अवकाळी जोरदार पाऊस झाला. गारांचाही सडाका पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, पोल तुटून पडले, डिपी उध्वस्त झाल्या, पत्रे उडाली, गव्हाण येथे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले, इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला. सदरील नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, अभिषेक अकनगिरे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी होते.

 वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे उडून घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्याचे नुकसान झालेल्या गव्हाण येथील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली. त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी. इंदरठाणा येथील मयत शेतगडी गुणाजी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आ कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावेळी गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, कृषी अधिकारी नितीन कांबळे, मराविमचे उप अभियंता काळे, मंडल निरीक्षक एस ए गायकवाड, तलाठी डी आर मोरे, त्याचबरोबर गव्हाण इंद्रठाणा परिसरातील वाजीद शेख, शिवमूर्ती उरगुंडे, बाळू कटके, परमेश्वर जाधव, दिनकर राठोड, पृथ्वीराज उरगुंडे, उज्ज्वल कांबळे, उत्तम राठोड, गुणवंत जोगदंड, बालासाहेब माने, देवानंद शिंदे, बालासाहेब बरीदे, सुभाष रायनूळे, गणपत पवार, काशीराम पवार, राम बरीदे, जगनाथ पवार, भारत वाघमारे, जनार्धन पवार, बळीराम बरीदे, विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने होते.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे    – *विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी**अतिमहत्त्वाच्या व्यक्तींपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणतीही गैरसोय होऊ नये, सूक्ष्म नियोजनाचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta

गटाशिक्षण आधिकारी पंस. चिखली श्री रमेश रतन डुकरे पाटिल यांना व त्यांना वाचविण्याऱ्या दोषी आधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई कराआमदार प्रशांत बंब

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

वांद्र स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महायोगी गुरू गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन