vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

गव्हाण, इंदरठाणा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; आ. रमेशआप्पा कराड यांच्याकडून नुकसानीची पाहणी

   लातूर प्रतिनिधी-  अचानकपणे विजेचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह जोरदार गारांचा पाऊस रविवारी सायंकाळी झाला यामुळे रेणापूर तालुक्यातील मौजे गव्हाण, इंदरठाणा परिसरात मोठे नुकसान झाले या नुकसानीची लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी पाहणी करून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान ग्रस्तांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा संबंधितांना सूचना दिल्या.

         रेणापूर तालुक्यातील काही भागात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ वाऱ्या होऊन अवकाळी जोरदार पाऊस झाला. गारांचाही सडाका पडला यामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, पोल तुटून पडले, डिपी उध्वस्त झाल्या, पत्रे उडाली, गव्हाण येथे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले, इंदरठाणा येथे शेतात वीज पडून शेतगड्याचा दुर्दैवी अंत झाला. सदरील नुकसानीची माहिती मिळाल्याने लातूर ग्रामीणचे आमदार श्री रमेशआप्पा कराड यांनी सोमवारी दुपारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, पंचायतराज सेल जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, मंडल अध्यक्ष शरद दरेकर, सतीश आंबेकर, दशरथ सरवदे, अभिषेक अकनगिरे, श्रीकृष्ण पवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी होते.

 वादळ वाऱ्यात घरावरील पत्रे उडून घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य, धान्याचे नुकसान झालेल्या गव्हाण येथील दयानंद ज्ञानोबा पवार आणि सुमनबाई भाऊसाहेब पवार यांच्या घराची पाहणी करून वैयक्तिक आर्थिक मदत केली. त्याचबरोबर सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी. इंदरठाणा येथील मयत शेतगडी गुणाजी कदम यांच्या परिवारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतून मदत करावी अशा सूचना आ कराड यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

   यावेळी गटविकास अधिकारी सुमित जाधव, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी, कृषी अधिकारी नितीन कांबळे, मराविमचे उप अभियंता काळे, मंडल निरीक्षक एस ए गायकवाड, तलाठी डी आर मोरे, त्याचबरोबर गव्हाण इंद्रठाणा परिसरातील वाजीद शेख, शिवमूर्ती उरगुंडे, बाळू कटके, परमेश्वर जाधव, दिनकर राठोड, पृथ्वीराज उरगुंडे, उज्ज्वल कांबळे, उत्तम राठोड, गुणवंत जोगदंड, बालासाहेब माने, देवानंद शिंदे, बालासाहेब बरीदे, सुभाष रायनूळे, गणपत पवार, काशीराम पवार, राम बरीदे, जगनाथ पवार, भारत वाघमारे, जनार्धन पवार, बळीराम बरीदे, विजयकुमार पवार शहाजी पवार शिवाजी पवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन,ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद; मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करा

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा*

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

vishwatmaklokswamivarta

पोलीस दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगली ग्रामीण पोलीस ठाणे विस्तारीत पहिल्या मजल्याचे लोकार्पण..