vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

विशिष्ट बियाणे व रासायनिक खताचा आग्रह धरु नये; कृषि विभागाचे आवाहन

विशिष्ट बियाणे व रासायनिक खताचा आग्रह धरु नये; कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, प्रतिनिधी : शेतकरी खरीप हगांमाच्या लगबगीला लागला असून, शेत मशागती, खते व बियाणे खरेदी करणे सुरु झाली आहे. कपाशी व सोयाबीन जिल्ह्यातील मुख्य पिके असून जिल्ह्यातील काही भागात विशिष्ट कापुस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत असल्याचे दिसुन येत आहे. तरी सर्व शेतकरी बंधुना आवाहन करण्यात येते की, बियाण्यामध्ये सर्वच वाण हे उत्कृष्ट दर्जाचे असुन भरपुर उत्पन्न देणारे आहेत. त्यामुळे विशिष्ट बियाणे किंवा रासायनिक खताचा आग्रह करुन नये.

सोयाबीन पिकात स्वपरागीकरण होत असल्याने शेतक-यांनी सोयाबीन बियाण्याची दरवर्षी बाजारातून नवीन वाण खरेदी करण्याची आवश्यकता नाही. एकदा खरेदी केलेल्या बियाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन केल्यास बियाणे तीन वर्षापर्यत वापरल्यास बियाण्यावरील खर्च कमी होईल. तरी सुध्दा बुलडाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये शेतकरी विशिष्ट कापुस व सोयाबीन बियाणे वाणाची मागणी करत आहे. कपाशीतील सर्व वाणाचे बिटी जैव तंत्रज्ञान एकच असुन सर्वाची उत्पादन क्षमता जवळपास सारखीच आहे. त्यामुळे शेतक-यांनी एकाच वाणाचा आग्रह धरण्यात येऊ नये. पिकाचे उत्पन्न हे जमिनीचा पोत, पाऊसमान, योग्य वेळी केलेली शेती मशागत यावर अवलंबुन आहे. पिकाच्या योग्य वेळेत झालेला पाऊस, जमिनीचा उत्तम पोत व वेळी व केलेल्या मशागतीमुळे भरगोस उत्पन्न मिळते.

घरच्या सोयाबीन बियाण्याची योग्य चाळणी व बिज प्रक्रीया करून घरच्या घरी उगवणशक्ती तपासुन 100 मिली पाऊस पडल्यानंतर 2 ते 3 सेमी खोलीत बियाण्याची पेरणी केल्यास पिक उगवणीबाबत तक्रार राहणार नाही. कुठलेही बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. लेबल वरील लॉट नंबर व बिलातील लॉट नंबर पडताळुन पाहावे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशी पिकाची लागवड 1 जुन नंतरच करावी,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

अभिप्राय कक्षामुळे पारदर्शक प्रशासनाची नवी दिशा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा राज्यस्तरीय सन्मानमहाराष्ट्र लोकसेवा हक्क दिनानिमित्त सन्मान

महाराष्ट्र सदन येथे 12 ते 14 डिसेंबर दरम्यान-महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दिल्लीकर खवय्यांसाठी मराठमोळी मेजवानी…

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

जागतिक सुरक्षित इंटरनेट दिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा कवच’; अर्थसंकल्प विकासाला गती देणारा कामगार मंत्री आकाश फुंडकर

प्रशासकीय गतिमानता, कार्यक्षमता वृद्धी व ज्ञानसंवर्धनासाठी अमरावती विभागात ‘महा-साधना सप्ताह’- विभागीय आयुक्त नयना गुंडे• विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘iGOT कर्मयोगी’ पोर्टलवरील प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन