vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊनतरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा- मंत्री अतुल सावे

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊनतरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा- मंत्री अतुल सावे

मुंबई, प्रतिनिधी : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत विविध महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. या योजनांद्वारे लाभार्थ्यांना व्यवसायवाढीचे मार्गदर्शन, वित्तीय मदत आणि आवश्यक सुविधा पुरवण्यात येत आहेत. राज्यातील तरुण उद्योजकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केले.

मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ तसेच महामंडळ अंतर्गत सर्व उपकंपनी यांच्या संचालक मंडळाची बैठक झाली.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाज, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक रवींद्र पेटकर, वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सर्व उपकंपनी यांच्या कार्यालयांसाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी. महामंडळाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेतच असावे.

या बैठकीत यापूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात आली. महामंडळाच्या संचालक मंडळावर नवीन संचालकांची निवड करण्यात आली.

०००0000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण ९८२ जणांचा विविध पुरस्काराने सन्मान महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा’ अभियान तीन टप्प्यात – नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

जय शिवाजी, जय भवानी”च्या जयघोषाने दुमदुमले गडचिरोली!*जय छत्रपती शिवाजी – जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न”शिवरायांचे विचार अंगीकारून व्यक्तिमत्त्व घडवा” – जिल्हाधिकारी एकता पार्क चे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

गल्फ देशांतील युद्धजन्य परिस्थिती जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जाहीर

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta