vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ‘घाटी’ येथे शनिवारी (दि.२१) बालकांच्या दिव्यांगत्व तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १४४ दिव्यांग बालकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे हा पायलट प्रकल्प राबविण्यात आल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्वाचे निदान व तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी (दि.२१) जिल्हा रुग्णालय घाटी येथील बाह्य रुग्ण विभाग येथे करण्यात आले.    उद्घाटन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वैशाली प्रशांत फडणीस यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, अधीक्षक श्रीमती गायत्री तळवडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जितेंद्र डोंगरे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्रीमती रेशमा चिमंद्रे, समाज कल्याण प्रादेशिक दिव्यांग उपायुक्त दीपक खरात यावेळी उपस्थित होते.

शिबिरात १४४ दिव्यांग बालकांनी तपासणी करण्यात आली. त्यात अस्थिव्यंग – २७, मानसोपचार – ४५, कान नाक व घसा – २०, बालरोग – ३९, नेत्र – १३ यांचा समावेश आहे. यापैकी ३ बालकांना शिबिरातच दिव्यांग विशेष ओळखपत्र (UDID) देण्यात आले, तर ३७ बालकांची UDID प्रक्रिया पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. उर्वरित बालकांना पुढील तपासणीसाठी बोलावण्यात आले आहे,असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने कळविले आहे

०००००

संबंधित पोस्ट

एन्व्हायरोटेक एशिया 2026′ परिषदेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जल व्यवस्थापनावर प्रभावी सादरीकरण…

सारथी संगणक प्रणालीवरील तांत्रिक अडचणी लवकरच दूर होणार ..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत “कृषिदिन व शेतकरी सत्कार समारंभ” उत्साहात संपन्न

नव्या मुंबईतील एक्सीडेंट ची घटना: वाशी टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेला डंपर 12 गाड्यांना धडकला

vishwatmaklokswamivarta

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-मतमोजणी कालावधीत मतमोजणी परिसरात कलम 163 लागु

vishwatmaklokswamivarta