vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबईतील पारसिक हिल, बेलापूर येथील धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई

नवी मुंबईतील पारसिक हिल, बेलापूर येथील धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई

 

    नवी मुंबई  प्रतिनिधी- भूखंड क्र. 59, सेक्टर-26, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथील इमारतीचा काही भाग दि. 27 जून 2025 रोजी कोसळल्याची माहिती मिळाल्यानुसार बेलापूर विभाग कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता इमारतीचा काही भाग कोसळल्याचे निर्दशनास आले.

          त्यानुसार दि. 28 जून 2025 रोजी सदर भूखंडावरील धोकादायक स्थितीत असलेली इमारत ए विभाग कार्यालय बेलापूर, यांचेमार्फत पूर्णत: निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

          महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आदेशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे तसेच उपअभियंता श्री. पंढरीनाथ चौडे, कनिष्ठ अभियंता श्री. अभय गावीत व श्री.धिरेन भोईर, श्री.नयन भोईर यांचे उपस्थितीत ही धोकादायक इमारत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभाग कार्यालय येथील अधिकारी – कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाकडील सुरक्षारक्षक कार्यरत होते. 2 जेसीबींसह 1 फोकलँड ही यंत्रसामुग्री आणि 10 मजूर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

           भू.क्र.59, सेक्टर-26, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील ही इमारत सन 2020-2021 या वर्षी सी-2 बी प्रवर्गामध्ये मोडत असल्याचे घोषित केले आहे. दि. 16.08.2024 व दि. 22.05.2025 रोजीच्या पत्रान्वये सदर इमारतीचे संरचनात्मक परीक्षण करुन घेण्याबाबत पत्राव्दारे संबंधितांस कळविण्यात आले होते. तथापि 27 जून रोजी या इमारतीचा काही भाग कोसळल्याचे निदर्शनास आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य हानी टाळण्यासाठी रहिवास नसलेली ही इमारत निष्कासित करण्यात आली.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्हा प्रशासनाचा संकल्प: ‘सेवा पंधरवडा’**सेवा परमो धर्म: जनतेची कामे आता वेगवान..!*

vishwatmaklokswamivarta

एन.डी.ए.,सी.डी.एस.परीक्षा 13 एप्रिल रोजी4447 उमेदवारांची बैठक व्यवस्था..

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

ग्राहकाने स्वतः जागरूक होऊन आपल्या हक्काचे संरक्षण करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

 जिल्हा परिषद, ठाणे राज्यात प्रथम क्रमांकावर; ‘कार्यालयीन मूल्यमापन’ मोहिमेत मिळवला गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान