vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत 

सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत

लातूर, प्रतिनिधी : शासनाने सन 2025-26 पासून खरीप हंगामासाठी सुधारीत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी 31 जुलै 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा हप्ता दर 2 टक्के आणि नगदी पिकांसाठी, विशेषतः कापसासाठी 3 टक्के निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 58,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम असून, शेतकऱ्यांना 1,160 रुपये हप्ता भरावा लागेल. तूर पिकासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 41,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 820 रुपये हप्ता आहे. मूग आणि उडीद पिकांसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर प्रत्येकी 25,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 500 रुपये हप्ता आहे. खरीप ज्वारीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 29,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 580 रुपये हप्ता आहे. कापसासाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 57,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 1,710 रुपये हप्ता आहे. तर बाजरीसाठी 70 टक्के जोखीम स्तरावर 26,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आणि 520 रुपये हप्ता आहे.ही योजना लातूर जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यामार्फत राबविली जाणार आहे.

अवैध मार्गाने विमा काढल्यास अर्ज रद्द होईल, तसेच बोगस विमा आढळल्यास संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. शेतकऱ्यांनी नजीकच्या बँक किंवा नागरी सुविधा केंद्रामार्फत पीक विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कायमस्वरुपी विना अनुदानित तत्वावरव्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी प्रस्तावाची मागणी

महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल : Rovision Tech Hub Pvt. Ltd. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

टाटा स्टीलमध्ये मोठ्या स्फोटानंतर भीषण आग, अनेक कामगार जखमी

vishwatmaklokswamivarta

छत्रपतींच्या महाराष्ट्रात हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा!,छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हिंदुत्वनिष्ठ महिलांची घोषणाबाजी !

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत अपहरण करणारी टोळी समजून रिक्षावाल्यासह दोन महिलांना जमावाची मारहाण, गुन्हा दाखल

vishwatmaklokswamivarta

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता* – *पालकमंत्री शंभूराजे देसाई*

vishwatmaklokswamivarta