vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

बेलापूर पारसिक हिल येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणातून हरित नवी मुंबईची रूजवात…

          नवी मुंबई प्रतिनिधी  -नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने आज पारसिक हिल, बेलापूर येथे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षदिंडीसोबत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाची संततधार असतानाही, सुखद आणि आल्हाददायक वातावरणात पेरू, चिकू, फणस, जांभूळ, सिताफळ, आवळा अशा ४० विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली.

  याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उद्यान विभाग परिमंडळ 1 उपायुक्त श्री. किसनराव पलांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, परिमंडळ 1 उपायुक्त श्री.सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ 1 उपआयुक्त डॉ.अजय गडदे व परिमंडळ २ उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे, सहाय्यक आयुक्त उद्यान श्रीम.ऋतुजा गवळी, सहा.आयुक्त बेलापूर डॉ. अमोल पालवे, उद्यान अधीक्षक श्री. प्रकाश गिरी तसेच इतर पर्यावरणप्रेमी नागरिक, समाजसेवक, उद्यान कामगार उपस्थित होते.

 यामध्ये विशेषत्वाने पोलीस व होमगार्ड भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या चेंबूर येथील अेम अकादमीचे प्रशिक्षक श्री.अजित नाकाडे यांच्यासह त्यांचे 115 प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. सर्वांनीच अत्यंत उत्साहाने वृक्षारोपण कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियनांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम केवळ वृक्ष लागवडीपुरता मर्यादित नसून, हे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्गाशी नाते अधिक दृढ करीत, हरित आणि आरोग्यदायी भविष्याचा संदेश प्रसारित करण्यात आला. आगामी काळात नवी मुंबई महानगरपालिका अशाच लोकसहभागातून आणि सामूहिक प्रयत्नांतून शहराला अधिक हरित आणि शाश्वत बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

000000

संबंधित पोस्ट

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

अमृत’ संस्था देतेय प्रशिक्षण; व्याज परतावा योजनेचाही लाभ….

vishwatmaklokswamivarta

जय श्रीराम’च्या जयघोषाने करवीरनगरीत रामराज्याचा जागर : विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्था यांचा सहभाग सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात भव्य हिंदू एकता दिंडी !

संत मुक्ताबाई पालखी सोहळा नियोजन आढावा बैठक; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

शबरी घरकुल योजनेतून प्रत्येक आदिवासी कुटुंबाला घर देण्याचा निर्धार   — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।