vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

 

बुलढाणा, प्रतिनिधी-जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील हे (दि.१५) ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण निमित्ताने बुलढाणा येथे आले, असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अभोरे पाटील यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटी दरम्यान भारतीय जनता पक्ष चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, माजी आमदार वसंतराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व भाजपाचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकत्रपणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली. जिल्यातील सार्वजनिक विकास कामे, अतिवृष्टीसाठी लागणारी मदत, कमी पाऊस झाल्यास करावयाच्या उपायोजना यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हाभरातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अंभोरे पाटील यांच्या घरी एकच गर्दी केले होती. पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी समजून घेत जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे कामे करण्याचे आदेश दिले. तसेच दर पंधरवड्याला मी बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात येणार आहे. शेतकऱ्यांसह जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समस्या समजून घेईल व ते सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल, असे मत कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

भाजपच्या संकल्प मेळाव्याला व सत्कार सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा… 🎊

vishwatmaklokswamivarta

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रेडाई-एमसीएचआय आयोजित ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळा

वरसोली येथे पाठांतर स्पर्धा संपन्न

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन