vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

खत विक्रीसाठी नवी एल-१ यंत्रणा अनिवार्य

द ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – खत विक्रेत्यांकडून खत विक्री करताना आता जुनी यंत्रणा न वापरता नवी एल-१ विक्री यंत्रणा वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय खत विभागाच्या सूचनेनुसार भारतीय आधार प्राधिकरणाने मानांकन दिलेली ही नवी यंत्रणा खत वितरणासाठी अत्यावश्यक आहे.

   जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व खत विक्रेत्यांनी नवी एल-१ विक्री यंत्रणा घेऊन ती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. या मुदतीनंतर जुन्या यंत्रणेद्वारे खत विक्री बंद होणार असून सर्व खते केवळ एल-१ विक्री यंत्रणेद्वारेच वितरित केली जाणार आहेत.

     ठाणे जिल्ह्यात एकूण १५३ नवीन एल-१ यंत्रे कार्यान्वित करण्यात आली असून, यासाठी आरसीएफ (RCF) कंपनी नेमण्यात आली आहे. कंपनीकडून ही यंत्रे खत विक्रेत्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

     मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या यंत्रणेच्या अंमलबजावणीस गती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे खत वितरण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व शिस्तबद्धता येणार असून शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळविणे सुलभ होईल.

 खत विक्रेत्यांनी २० ऑगस्टपूर्वी नवी एल-१ यंत्रणा कार्यान्वित न केल्यास त्यांना दुकानातून खत विक्री करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाने दिला आहे.

 अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद, ठाणे येथील कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे

000

संबंधित पोस्ट

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण· मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ‘आर्थिक आधार’…

vishwatmaklokswamivarta

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मारकस्थळी वैचारिक अभिवादन,5 डिसेंबरला डॉ.अजित रानडे यांचे ‘आर्थिक लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर व्याख्यान

vishwatmaklokswamivarta

साकीनाका येथे बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश, फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक*

vishwatmaklokswamivarta

राज्यात मधक्रांती घडवून आणण्यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळ प्रयत्नशील -खादी ग्रामोद्योग मंडळ सभापती रवींद्र साठे

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेला भेट

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*