vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

रायगड प्रतिनिधी:- धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत दि.8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामनिधी, खोपोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन (दि.9 सप्टेंबर रोजी) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते झाले.या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती नेहा भोसले, तहसिलदार कर्जत डॉ.धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण, श्रीमती तेजस्विनी गलांडे हे मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी प्रशिक्षणार्थीना संबोधित करताना सांगितले की, रायगड जिल्ह्यातील 113 आदिवासी वाड्यांमध्ये सर्वसमावेशक योजना राबवून वाड्यांचा समृद्ध विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि मास्टर ट्रेनर्सना आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्वतः प्रत्येक तालुक्यातील दोन वाड्यांना भेट देऊन ग्राम विकास आराखड्यांचा आढावा घेणार असून, सर्व 113 वाड्यांचे आराखडे स्वतः तपासून शासनाकडे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये तालुकास्तरावरील 71 मास्टर ट्रेनर्सना जनजातीय गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य व माहिती प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये विविध योजना, समुदाय संवाद, ग्रामविकास आराखडा निर्मिती आणि नेतृत्व क्षमता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांच्या शाश्वत आणि समावेशी विकासासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून या उपक्रमामुळे स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग वाढून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे

संबंधित पोस्ट

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच; पूर्वतयारी बैठकीत प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन

विधानसभा लक्षवेधी:सोलापूर जिल्ह्यातील वृक्षलागवड प्रकरणी चौकशी करून कारवाई- वनमंत्री गणेश नाईक

महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी

vishwatmaklokswamivarta