vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

तुंग, आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्याहस्ते उद्‌घाटन- शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून मानले प्रशासनाचे आभार

सांगली, प्रतिनिधी) : राज्याचे अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी आज मिरज तालुक्यातील तुंग आणि वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथे भेट देऊन 100 दिवस कृती आराखडा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांचे उद्‌घाटन करून पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार राजशेखर लिंबारे आदि उपस्थित होते.

तुंग येथे तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या सामंजस्याने तयार करण्यात आलेल्या कृष्णानंद पाणंद रस्त्याचे उद्‌घाटन अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, वाळवा तालुक्यातील आष्टा, कारंदवाडी येथील पाणंद रस्त्यांचेही उद्‌घाटन श्री. खारगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रस्त्याची पाहणी करून त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामुळे पाणंद रस्ता झाला आहे. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांनी पाणंद रस्ता खुला केल्याबद्दल समाधान व्यक्त करून अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी अशोक काकडे व महसूल प्रशासनाचे आभार मानून सत्कार केला.

पूर्वी रस्ता नसल्याने त्रास होत होता. मात्र आता हा रस्ता झाल्यामुळे वहिवाट सुलभ झाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी त्यांचे रस्ता होण्यापूर्वी व रस्ता झाल्यानंतरचे अनुभव कथन केले. शेतात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता उपलब्ध असणे हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. शेत व पाणंद रस्ते हे शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी व शेतातील यंत्रसामग्री नेण्यासाठी आवश्यक असलेले मार्ग आहेत. पाणंद रस्ते खुले झाल्यामुळे शेतीसाठी वाहतूक व दळणवळणाची सोय उपलब्ध होऊन शेतीमाल आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करणे सोपे होत असल्याची भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धरणे, जलसाठ्यांचे सप्टेंबरपर्यंत सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी- पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे शानदार उद्घाटन**मुला मुलींच्या परिपूर्ण विकासासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या**- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन* 

vishwatmaklokswamivarta