vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकमार्फत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

पात्रता निकष:• अर्जदाराचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे• दिव्यांग व्यक्तींसाठी वयोमर्यादा ४० वर्षे• कला/साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षे सातत्यपूर्ण व दर्जेदार योगदान असणे आवश्यक• अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- रुपयांपेक्षा कमी असावे• फक्त कलेवर अवलंबून असणारे किंवा सध्या उत्पन्नाचा अन्य स्रोत नसलेले कलाकार• केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले• अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक• विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, वयाने ज्येष्ठ कलाकारांना प्राधान्

आवश्यक कागदपत्रे:• वयाचा दाखला• आधार कार्ड• रहिवासी दाखला• उत्पन्नाचा दाखला• प्रतिज्ञापत्र• पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)• बँक पासबुक झेरॉक्स• अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास)• पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)• शिफारसपत्र (नामवंत संस्था/व्यक्तीचे – लागू असल्यास)• कलात्मक कार्याची विविध साक्षी/पुरावे

 ठाणे जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा प्रशासन कामगारांच्या मागण्यांविषयी सकारात्मक पावले उचलत असताना बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे कामगार संघटनांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

जालना शहरासाठी श्रमदान – एक दिवस- एक तास शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी हातभार लावा      – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल 

vishwatmaklokswamivarta

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta