vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना २०२५-२६ अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा ५,००० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत आपले सरकार पोर्टलवर https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकमार्फत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणे मार्फत करण्यात येत आहे.

पात्रता निकष:• अर्जदाराचे वय ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे• दिव्यांग व्यक्तींसाठी वयोमर्यादा ४० वर्षे• कला/साहित्य क्षेत्रातील किमान १५ वर्षे सातत्यपूर्ण व दर्जेदार योगदान असणे आवश्यक• अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- रुपयांपेक्षा कमी असावे• फक्त कलेवर अवलंबून असणारे किंवा सध्या उत्पन्नाचा अन्य स्रोत नसलेले कलाकार• केंद्र/राज्य शासनाच्या कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत समाविष्ट नसलेले• अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक• विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, वयाने ज्येष्ठ कलाकारांना प्राधान्

आवश्यक कागदपत्रे:• वयाचा दाखला• आधार कार्ड• रहिवासी दाखला• उत्पन्नाचा दाखला• प्रतिज्ञापत्र• पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)• बँक पासबुक झेरॉक्स• अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास)• पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)• शिफारसपत्र (नामवंत संस्था/व्यक्तीचे – लागू असल्यास)• कलात्मक कार्याची विविध साक्षी/पुरावे

 ठाणे जिल्ह्यातील पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करावा, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) प्रमोद काळे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जयपूर डायलॉग’ हा राष्ट्रीय विचारांचा मंच- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जयपूर डायलॉग डेक्कन समिट

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ भारत मिशनमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या पाचमध्ये असावा – पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

धारावीतील खराब रस्ते व अडथळा युक्त फुटपाथ सुधारावेत धारावी नागरिक समितीची मागणी

थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्रासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबविणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवर महानगरपालिकेमार्फत सखोल स्वच्छता मोहीमा

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन