vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..    

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जन्मदिनी रक्तदानातून मानवंदना घनसावंगी विधानसभेत शेकडो कार्यकर्त्यांचे रक्तदान…..

राज्य प्रतिनिधी घनसावंगी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून संपूर्ण महाराष्ट्रभर “महा रक्तदानाचा संकल्प” राबविण्यात आला. देवेंद्रजींचा वाढदिवस ‘उत्सव’ म्हणून नव्हे तर ‘उत्तरदायित्व’ म्हणून साजरा करत, घनसावंगी विधानसभा मतदारसंघात समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीनही मंडळात भव्य रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरात २२८ भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सामाजिक जबाबदारी निभावली.

घनसावंगी तालुक्यात समृद्धी साखर कारखाना येथे भाजपा तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम उढाण यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रांजणी (जालना ग्रामीण) येथे मंडळ अध्यक्ष संजय आटोळे यांनी उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. तर शहागड येथे तालुका प्रमुख शिवाजी मोरे यांच्या वतीने शिबीर घेण्यात आले. या शिबिरास निवडणूक प्रमुख सतीश घाटगे, भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी भेट दिली. प्रत्येक ठिकाणी रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा विधायक उपक्रम “सेवा हीच संस्कृती” या भाजपच्या विचारधारेचे जिवंत उदाहरण ठरला आहे. या शिबिरासाठी शहागड घनसावंगी आणि रांजणी मंडळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तसंकलनासाठी जनकल्याण रक्तपेढी व लोकमान्य रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. याबद्दल संपूर्ण टीमचा सतीश घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनमहाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) (मिमी)सकाळी ८:०० वाजेपर्यंत:

शालेय शिक्षण विभागातील विविध विषयांचा मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पटसंख्या वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे काटेकोरपणे नियोजन करा — रोहयो मंत्री भरत गोगावले #शिवराज्याभिषेक रायगड जिमाका दि. १६– रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे तिथी व तारखेनुसार अनुक्रमे ६ व ९ जून रोजी आयोजन करण्यात आले आहॆ. या कार्यक्रमाच्या नियोजनाची रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षते खाली सर्व प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी सर्व यंत्रणेला दिल्या. महाड शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अप्पर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचा विषय आहॆ. गेली ३५ वर्ष हा उत्सव सुरु आहॆ. या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहॆ. त्यामुळे हा कार्यक्रम सुनियोजित व सुव्यवस्थितपणे पार पडण्याची जबाबदारी सर्वांवरच आहे. तेव्हा प्रत्येकाने आपले काम चोखपणे करावे. शिवभक्तांना सर्व सोयी सवलती विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात त्यामध्ये कुठलेही हयगय करू नये असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यंदा मान्सून लवकर सुरु झाला आहॆ. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंडप, भोजन, विद्युत आणि आरोग्य व्यवस्था तैनात ठेवाव्यात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वैद्यकीय पथक सुसज्ज ठेवावे, गडावर पुरेश्या प्रमाणात वैद्यकीय पथक, स्ट्रेचर, औषधसाठा ठेवावा. विशेषता सर्पदंश होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधे उपलब्ध ठेवावीत. जिल्हा प्रशासनाने कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समित्यानी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी असेही श्री गोगावले यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री जावळे म्हणाले की,शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या समित्याची नेमणूक केली आहे. मुख्यत्वे आरोग्य,पाणी पुरवठा,मंडप,खानपान, राजशिष्टाचार,परिवहन, विद्युत, पाणी आणि शौचालय आदी सर्व समित्यांची नेमणूक केली आहॆ. सर्व नियोजन सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीत सर्व समित्यानी केलेल्या कामाचा आढावा सादर केला. तसेच कोकण कडा मित्र मंडळाने देखील आवश्यक बाबीबाबत सूचना केल्या.