vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

जालना,  (प्रतिनिधी) – भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर यांच्या तर्फे जालना शहरातील गुरु गणेश भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महा रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, चित्रप्रदर्शनी आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून, जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.कैलासजी गोरंट्याल, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे.

या प्रसंगी “पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस केवळ औपचारिकतेपुरता न राहता समाजोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करणे हीच खरी सेवा आहे, “नागरिकांनी अशा शिबिरांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, हेच समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल, भाजपाच्या कार्यपद्धतीत समाजसेवा हेच केंद्रबिंदू असून या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये सेवा व सहभागाची भावना दृढ होत आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान करून आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार चौकशीसाठी विशेष चौकशी पथक- पणन मंत्री जयकुमार रावल

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; ८७ उमेदवारांची निवड

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा समारोप : भारतासह २३ देशांतील ३० हजार हिंदूंचा सहभाग हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत -आमदार टी. राजासिंह, तेलंगणा

कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन,भरारी पथके वतक्रार निवारण समित्यांची स्थापना तक्रार निवारण हेल्पलाइन क्रमांक 8830264335

बिहारमधील अनेक भागांत, विशेषतः पटना शहरात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत.

vishwatmaklokswamivarta