vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी 

शेतकऱ्याच्या बांधावर जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी

    जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गाव परिसरात शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष जावून पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे उभी पिके जमिनदोस्त झाली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी जनार्धन मात्रे यांच्याशी संवाद साधत झालेल्या पिक नुकसानीची माहिती जाणून घेतली. शासन नुकसानग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून काळजी करु नका अशा शब्दांत बाधित शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी तुर, कापुस व सोयाबीन या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच अतिवृष्टीने बाधित पिकाने अतोनात नुकसान झाले असून शासन शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे मत पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी आमदार नारायण कुचे, भाऊसाहेब घुगे, उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, नायब तहसीलदार श्री. राजमाने यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली जालना शहरातील विविध भागात पाहणी

  मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जालना शहरातील महापालिकेसमोरील परिसरातील शिवशक्ती ग्रीन सिटीत अतिवृष्टीने सखल भागात पावसाचे पाणी साचलेल्या भागातील रहिवासी भेट घेवून विचारपूस केली तसेच रेल्वे स्थानकाशेजारील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील घरामध्ये पाणी साचलेल्या भागाची पाहणी केली. अतिवृष्टीने घरांचे खुप मोठे नुकसान होवून घरात पाणी शिरले आहे. या संकटात सापडलेल्या रहिवाशांना अन्न व इतर आवश्यक बाबी पुरविण्याबाबत जिल्हा प्रशासनाला नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे साहित्य तरुणांमध्ये ऊर्जा निर्माण करते -अ‍ॅड.भास्कर मगरे

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह-छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

नागरिकांना पारदर्शक व वेळेत सेवा द्या – जिल्हाधिकारी सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ

भिवंडी व शहापूर तालुक्यातील जनजीवन मिशन योजनांमधील-अडचणी तातडीने मार्गी लावा-पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्र यात्रा; वेरुळ मध्ये वाहनांना प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta