vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप

    अमरावती, द प्रतिनिधी : सेवा पंधरवड्यानिमित्त महसूल विभागातर्फे महाराजस्व अभियानातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात अमरावती तहसिल कार्यालयातर्फे भटके, विमुक्त जातीच्या नागरिकांना विविध लाभाचे वाटप करण्यात आले.   तहसिल कार्यालयातील कार्यक्रमाला आमदार रवि राणा, राजेश वानखडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.    श्री. राणा यांनी या उपक्रमामुळे नागरिकांना तातडीने सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. घरकुल, पट्टेवाटप यामुळे समाजातील शेवटच्या घटकांना न्याय मिळणार आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे वंचित घटकांना आधार मिळेल. गावठाणातील घरांसाठी गावाची हद्द वाढविण्याची सूचना आली आहे. त्यामुळे वाढीव गावाला मान्यता मिळणार आहे. येत्या काळात राज्यात सर्वाधिक पट्टे वाटप अमरावतीमध्ये व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच पावसामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.श्री. वानखडे यांनी वंचित घटकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. प्रत्येकाला घर मिळाल्यास कुटुंबाची स्थायी व्यवस्था होणार आहे. एका ठिकाणी भटक्या, विमुक्त जाती स्थायी झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

    श्री. भटकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पट्टेवाटप, कृषि निविष्ठा, तसेच विविध प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

000000

संबंधित पोस्ट

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

📌आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणात दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस पावले उचला*  *रुग्ण कल्याण समिती नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना**वैद्यकीय महाविद्यालयाच्या पूरक कामांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवा💊*औषधे खरेदी व वितरण तपासण्याच्या सूचना

बेकायदेशीर शुल्कवाढ नियमांत दुरुस्ती करण्यात येणार- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीच्या पावन मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या ‘स्वराज्य सप्ताह’ या उपक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात.

vishwatmaklokswamivarta