
आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर
राज्य प्रतिनिधी –
आपत्तीग्रस्तांसाठी केंद्र सरकार ने महाराष्ट्राला आर्थिक मदत जाहीर केली आहे,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, महाराष्ट्राला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी एक हजार पाचशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत. ही मदत राज्याला पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीसाठी देण्यात येणार आहे. या निधीमुळे प्रभावित नागरिकांना तातडीने मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
केंद्र सरकारने यावर्षी राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत एकूण सत्तावीस राज्यांना तेरा हजार सहाशे तीन कोटी रुपये राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत पंधरा राज्यांना दोन हजार एकशे नव्याण्णव कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय, राज्य आपत्ती निवारण निधी मधून एकवीस राज्यांना चार हजार पाचशे एकोणसत्तरी कोटी रुपये आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी मधून नऊ राज्यांना तीनशे बत्तीस कोटी रुपये दिले गेले
महाराष्ट्राला मिळालेली एक हजार पाचशे सहासष्ट कोटी रुपयांची मदत ही राज्य आपत्ती निवारण निधीच्या केंद्रीय वाट्याचा दुसरा हप्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, या निधीची कार्यवाही ⁴ पूर्ण होईल आणि ती राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचेल.
केंद्र सरकारने पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे प्रभावित राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या मदतीमुळे प्रभावित नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत मिळणार आहे आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
याशिवाय, राज्य सरकारने या निधीचा वापर प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचेही आश्वासन दिले आहे. प्रशासनाने हे सुनिश्चित करावे की, निधी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी खर्च होईल, जेणेकरून प्रभावित लोकांना वास्तविक मदत मिळेल आणि भविष्यातील आपत्तींसाठी तयारी करता येईल.
0000



