vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- येथील आयकर कार्यालय, टीडीएस मार्फत टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी एका कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीची दि.७ रोजी चौकशी केली. या कंपनीने २० कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कपात केला नाही तसेच अन्य व्यवहारांमध्ये कापलेले ७१ ल्काह रुपयांचे टीडीएस सरकार खात्यात जमा केले नाही,असा आरोप आहे, अशी माहिती आयकर अधिकारी (टीडीएस) राहुल मोरे यांनी दिली आहे.

 येथील कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात सर्वे करुन दिवसभर विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कंपनीने दिलेल्या व्याजावर लागू असलेला दहा टक्के टीडीएस कापला नाही आणि इतर व्यवहारांवर कापलेल्या टीडीएस केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला नाही, या कारणास्तव आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी कंपनीची सखोल चौकशी केली. आयकर कायदा १९६१ च्या कलम १९ ए च्या तरतुदीनुसार, कोणत्याही कंपनीसाठी व्याज देताना दहा टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे. तथापि, कंपनीने सुमारे वीस कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कापला नाही. शिवाय, कंपनीने इतर व्यवहारांवर कापलेले सुमारे ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकारी खात्यात जमा केले नाही,असाही आरोप आहे.तपासणी दरम्यान व्याजासह ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

संबंधित सर्वांनी आयकर कायदा,१९६१ च्या सर्व टीडीएस तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. 00000

संबंधित पोस्ट

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

vishwatmaklokswamivarta

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियाना’ला गती – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे