vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी गौणखनिज व रेती माफियांकडून ड्रोनचा वापर केला जात असल्याची खात्री करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या माफियांकडून हा प्रकार होत असल्याचे स्थानिक नागरिक आणि प्रसारमाध्यमांनी पालकमंत्री ना. पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत त्यांनी जिल्ह्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला दिले.

पालकमंत्री ना. पाटील यांनी स्पष्ट केले की, महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर हा प्रशासनाच्या कामकाजात अडथळा आणणारा आणि कायद्याला थेट आव्हान देणारा प्रकार आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

*****

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्याची ग्रामीण गृहनिर्माण मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरी; १०५% घरकुले पूर्ण!

जिल्हा रुग्णालयात अवयवदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न; अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा असल्याचा संदेश…

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

आज मध्य महाराष्ट्र, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता …

vishwatmaklokswamivarta

नागपूर जिल्ह्यातील #राऊळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रति मिनिट 1.5 लाखांहून अधिक तिकिटे देण्याची म्हणजेच,मिनिटाला 32,000 तिकीटे देणाऱ्या सध्याच्या प्रणालीच्या पाच पट क्षमता असलेली नवी प्रवासी आरक्षण प्रणाली या वर्षअखेरीपर्यंत तयार होणार प्रवाशांची सोय आणि स्मार्ट तिकीट प्रणालीवर भर देत भारतीय रेल्वे आपली प्रवासी आरक्षण प्रणाली बहुभाषिक बनवणार