vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

जालना, प्रतिनिधी : महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन वात्सल्य व मिशन शक्ती’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकल महिला पुनर्वसन, मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती तसेच मिशन वात्सल्य त्रैमासिक आढावा बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते.

          या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,पोलीस उप अधीक्षक श्री. निकाळजे, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर, युनिसेफच्या सदस्य अल्पा वोरा यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

        जालना जिल्हात घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा व अविवाहित अशा एकूण 69,358 एकल महिला आहेत. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी तालुकानिहाय एकल महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन, यांना सर्वप्रथम शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच या महिलांसाठी आरोग्य, पोषण व त्यांच्यासाठी शासन स्तरावरुन ज्या काही योजना राबविल्या जातात, त्यांची माहिती व लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महिलांचा समावेश महिला बचत गटात करणे, बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, रोजगार विषयक कार्यशाळा आयोजित करणे. तसेच या बैठकीत एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच त्यांना आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

          मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण, स्वावलंबन व रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिलांवरील हिंसाचार प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे, तसेच विविध विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ प्रभावीपणे सर्व पात्र लाभार्थांना देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

जनगणना’२०२७’ कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारउपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली ‘स्व-गणना’राष्ट्रीय मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

महाराजस्व अभियानात नागरिकांनी विविध योजनाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.सातबारा विलगीकरण करून ६८ सातबारा प्रमाणपत्र वितरण

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार