vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन

जालना, प्रतिनिधी:- जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांतून अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनांकडून पाणीपट्टी भरण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सध्या विभागाची 4 कोटी 85 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत योजनाधारकांनी सात दिवसांची अंतिम मुदतीत आपली थकबाकी जमा करावी, असे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6, कलम 49 (ज) नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर संबंधित योजनेचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

वसुंधरा दिनानिमित्त फेस कॉम ग्रुप ज्येष्ठांची निसर्ग उद्यानाला भेट…

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

राज्यात ठीक ठिकाणी पावसाच्या सरी सुरूच आहे#रायगड आज सकाळी ०६:०० वाजता जारी मध्यम वज्रवृष्टी व धक्क्याने वारे ४१-६१ किमी/तास जोरदार पाऊस > १५ मिमी/तास वैध वेळ: ०९:०० वाजेपर्यंत कृपया सावध रहा व सुरक्षित रहा!

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा

१०० दिवस उद्दिष्ट कार्यक्रम; ११ वी, १२ वी विज्ञानच्या मागासवर्गीय-विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच मिळणार जातवैधता प्रमाणपत्र

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta