vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

नांदेड, प्रतिनिधी :- नांदेड जिल्ह्यात 26 फेब्रुवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 12 मार्च 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 26 फेब्रुवारीचे सकाळी 6 वाजेपासून ते 12 मार्च 2026 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना एक वर्षासाठी लागू रायगड जिल्ह्यात ‘भारतीय कृषी विमा कंपनी’ची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे अंतिम आरक्षण जाहीर*

vishwatmaklokswamivarta

खानापूरच्या गणेश बुरूजाचे नगरपंचायतीकडे हस्तांतरण जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आदेश सुपूर्द- पुरातन बुरूजाच्या सुशोभिकरणातून शहराच्या वैभवात भर- देखभाल, दुरूस्तीसह वृक्षारोपणाची अट…

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय विभागाचा आज राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा-सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका