vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाणार आहे.

     या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित फळपिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः गारपीटीमुळे (Add-on Cover) नुकसान झाल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती विमा कंपनी किंवा संबंधित मंडळ कृषि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनीकडून जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी Bajaj Allianz General Insurance Company Limited (टोलफ्री: १८०० २०९ ५९५९) यांच्याशी संपर्क साधावा

     गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेत माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊन फळपिकांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

विधानसभा प्रश्नोत्तरे-राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करणार- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मोटार वाहन कर व दंड वसुली मोहिमेअंतर्गत कामगिरीची माहिती जाहीर

बांधकाम प्रकल्पांचे निरीक्षण ‘आयओटी-एआय’द्वारे होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,बृहृन्मुंबई महानगरपालिकेला ‘रिअल-टाईम’ प्रणाली उभारण्याचे निर्देश

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

दि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पारितोषके

vishwatmaklokswamivarta

03 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापालिका लोकशाही दिन

vishwatmaklokswamivarta