vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

फळपिक विमा योजनेच्या लाभाबाबत आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ मध्ये सांगली जिल्ह्यात राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे यांच्या माध्यमातून अंमलात आणली जाणार आहे.

     या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष या अधिसूचित फळपिकांचा समावेश असून शेतकऱ्यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे, विशेषतः गारपीटीमुळे (Add-on Cover) नुकसान झाल्यास, विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती विमा कंपनी किंवा संबंधित मंडळ कृषि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनीकडून जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्यक्ष पाहणी करून वैयक्तिक स्तरावर नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी Bajaj Allianz General Insurance Company Limited (टोलफ्री: १८०० २०९ ५९५९) यांच्याशी संपर्क साधावा

     गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी वेळेत माहिती देऊन पंचनामे करून घ्यावेत, तसेच या योजनेचा लाभ घेऊन फळपिकांचे आर्थिक संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.

0000

 

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

नवउद्योगांना मंजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्यात चौथा तर अमरावती विभागात पहिला!Ø मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ; ३३० नवउद्योजकांनी उभारले उद्योग..

आसामच्या जोरहाट हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ विमानाला अपघात, ५ जवानांना वीरमरण.

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रासाठी अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्रात पुढील आठवडाभर पावसाचा जोर

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta