vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

करवंड येथे ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन

बुलढाणा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि गुणवंताबाई इंगळे यांच्या ऐतिहासिक विवाह स्मृतींना यंदा तब्बल 370 वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक घटनेचे औचित्य साधत बुलढाणा जिल्ह्यातील करवंड येथे बुधवार, 15 एप्रिल 2026 रोजी ‘ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि करवंड महोत्सव कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता भव्य ऐतिहासिक शोभायात्रेने होणार असून, यात शिवराय आणि गुणवंताबाईंच्या वेशभूषेत कलाकार, लेझिम पथके, बँड, अश्वदल आणि पालखी यांचा आकर्षक सहभाग असणार आहे. यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उद्घाटन सोहळा पार पडणार असून, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.

दुपारी 1 ते 2 या वेळेत पोवाडा व विविध लोककला सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सुप्रसिद्ध शाहिर रामानंद उगले यांच्या शौर्यगाथांवर आधारित विशेष कार्यक्रम होईल. दुपारी 3 ते 5 या वेळेत नामवंत इतिहासकार रामचंद्र पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री 8 ते 10 या वेळेत कोल्हापूर व सातारा येथील 50 पेक्षा अधिक कलाकारांच्या सहभागातून ‘तीर्थ शिवराय’ हे भव्य महानाट्य सादर करण्यात येणार आहे. यासोबतच युद्धकला प्रात्यक्षिके तसेच कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण देखील होईल. महोत्सवाचा समारोप रात्री 10 वाजता भव्य ऐतिहासिक बारूद आतषबाजीने होणार आहे.

या महोत्सवात प्राचीन नाणे प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि महिला बचत गटांचे विविध स्टॉल्स हे देखील विशेष आकर्षण ठरणार आहेत. यावेळी शिवरायांच्या सर्व महाराणींच्या घराण्यातील वंशजांची उपस्थिती लाभणार असून, आमदार श्वेताताई महाले पाटील आणि करवंड महोत्सव कृती समितीच्या वतीने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात ‘एचटीबीटी’ कापूस बियाण्यांवर बंदी *नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्षे कारावास

पनवेल येथे सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रेचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन,पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती…

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर

पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात घ्यावा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत भारत जिंदाबाद यात्रा काढून सिन्दुर ऑपरेशनचा विजय साजरा*