vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” व “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” विषयावर व्याख्यान संपन्न

राज्य प्रतिनिधी-सामाजिक समता सप्ताहानिमित्त “महिला मेळावा” तसेच “संविधान जागर आणि महिला सक्षमीकरण” या विषयांवर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी रोड, येरवडा, पुणे येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मा सुतार, गृहप्रमुख, शासकीय वसतिगृह, विश्रांतवाडी होत्या. या कार्यक्रमास नगरसेविका नंदिनी सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका शीतल सावंत, माजी उपमहापौर श्री सिद्धार्थ धेंडे, समाजकल्याण अधिकारी माधुरी वाघमोडे, व्याख्याते पुष्पा घोडके, वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्या वृषाली रणधीर, मामासाहेब मोहळ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या मेघना भोसले आणि जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधी श्रीमती सुपेकर उपस्थित होत्या.श्रीमती धेंडे सामाजिक समता सप्ताह व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

श्रीमती घोडके यांनी “संविधान जागर” या विषयावर मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षण, कायदेशीर संरक्षण, तसेच समानतेचे हक्क मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अधोरेखित केले.

श्रीमती रणधीर यांनी “महिला सक्षमीकरण” या विषयावर मार्गदर्शन करताना महिलांचे अधिकार, कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतिगृहांचे गृहप्रमुख व गृहपाल तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती भोईटे गृहपाल यांनी केले. त्यांनी सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उषा कांबळे समतादूत, बार्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल बंडगर प्रकल्प व्यवस्थापक, समतादूत प्रकल्प, बार्टी यांनी आहे

संबंधित पोस्ट

मासेमारी नौकांसाठी मार्च महिन्यात१ लाख ६८ हजार कि.ली. डिझेल कोटा मंजूर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाचे प्रकाशन

संजय गांधी निराधार योजना; रेणापूर तालुका अध्यक्षपदी सतीश आंबेकर तर लातूर तालुका अध्यक्षपदी बन्सी भिसे यांची निवड

जालना शहरातील सर्व नागरिकांना सूचना- जालना महानगरपालिका

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तर :नर्मदा नदीचे ११ टीएमसी पाणी वापरासाठीचीप्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन