vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

नांदेड, प्रतिनिधी :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत.

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत.

बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

बारामतीतील शासकीय रुग्णालय व आयुर्वेद महाविद्यालयाला ‘स्व. अजित (दादा) पवार’ यांचे नाव

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

राष्ट्र्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गतविविध घटकांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार