vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दि. १८ एप्रिल २०२६ पासून उन्हाळी सुट्टीपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेत भरतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी दिला आहे.

 

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत हा आदेश देण्यात आला असून, शाळांनी व्यवस्थापन समितीची मंजुरी घेऊन अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित निर्णयाची माहिती सर्व मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांनी परीक्षेचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सकाळी ७ ते १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहणे आवश्यक राहील.

संबंधित पोस्ट

कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी* *श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त* “*भारताच्या नकाशाची देशाची मानवी प्रतिकृती साकार*”

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

जालन्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई: परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम करणार्‍यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई1 कोटी 22 लाख 76 हजार 200 रुपयांचा मुददेमाल जप्त..

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणार- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

नैसर्गिक झऱ्यांची गणना; आपल्या भागातील झऱ्यांची माहिती कळवा-भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेचे आवाहन