vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र १२ दिवसांपासून अन्नत्याग; खंडणी, तोडफोड व जीवघेण्या धमक्यांचा आरोप – प्रशासन मात्र शांत

 

जालना (प्रतिनिधी) : मालकी हक्काच्या लढ्यासाठी सौ. जयश्री संजय कटके यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आता बाराव्या दिवशी पोहोचले असून त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट सवाल उपस्थित केला आहे. कटके यांनी गंभीर आरोप करत म्हटले आहे की, सुनील मोहनलाल राठी, अनिल मोहनलाल राठी, मयूर राठी, अनिल मालपाणी व सुरेश मालपाणी यांनी गुंडांच्या मदतीने त्यांच्या जागेवरील सामानाची तोडफोड केली, बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तसेच ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर जीव घेण्याचाही प्रयत्न झाल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून स्वतःच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण द्यावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, १२ दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का? सामान्य नागरिकांना न्याय मिळणार की नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. उपोषणाचा तेरावा दिवस सुरू होत असताना प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

00000

संबंधित पोस्ट

आत्ताची मोठी बातमी 🚍 राज्य परिवहन महामंडळाची शिवनेरी बससेवा आता फक्त मुंबई–पुणे नव्हे, तर नाशिक–पुणे, पुणे–कोल्हापूर, नागपूर–अमरावती, पुणे–सोलापूरसारख्या मार्गांवरही लवकर सुरू होणार!

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

एनडीआरएफ, एसडीआरएफमार्फत नवी मुंबई महापालिकेत आपत्ती व्यवस्थापनाविषयक प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा सभा,  बीडचे आमदार सुरेश धसांचा जाहीर सभेत इशारा काय म्हणाले ते पहा

महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनविण्याचा संकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांशी संवाद

vishwatmaklokswamivarta

चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) नेमणूकीकरिता इच्छुक खाजगी चार्टर्ड अकाऊंटंट (लेखा परिक्षक) यांनी अर्ज करावेत