vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) २०२६‘ अंतर्गत देशामध्ये ३१ हजार ४८० हून जागेवर विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत इंटर्नशिपचा कालावधी साधारणपणे ६ किंवा ९ महिन्यांचा असणार आहे. इंटर्नशिपदरम्यान उमेदवारांना दरमहा रुपये ९ हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार असून इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

 

योजनेसाठी पात्रतेचे निकष: उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांदरम्यान असावे. उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा किंवा बीए.बीएस्सी, बीकॉम, बीसीए, बीबीए, बीफार्मा शाखेत आदी पदवीधर उमेदवारांना या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे. पूर्णवेळ नोकरी करणारे किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. मात्र ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेणारे उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्जासाठी पात्र असतील.

 

या योजनेत MAHINDRA AND MAHINDRA LIMITED, BAJAJ AUTO LIMITED, RELIANCE INDUSTRIES LIMITED, BAJAJ ALLIANZ LIFE INSURANCE COMPANY, BERGER PAINTS INDIA LIMITED, EMCURE PHARMACEUTICALS LIMITED, HONDA MOTORCYCLE AND SCOOTER INDIA PVT. LTD., BVG INDIA LIMITED, COGNIZANT, IBM INDIA PRIVATE LIMITED अशा नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध आहे.

इच्छुक उमेदवारांनी मर्यादित कालावधीत https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून रिक्त पदांसाठी अर्ज करावा.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०२०-२६१३३६०६ दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

संबंधित पोस्ट

राऊळगाव दुर्घटनेतीन मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ८२ लक्ष रुपयांची मदत – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जखमींना २५ लक्ष रुपये देण्याचे निर्देश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यात किमान ५ लाख उद्योजक निर्माण करण्याचे प्रयत्न- कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा…

भाजपा नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते जवळगा (सेलू) येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

8 एप्रिल रोजी दुसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन ; कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

नियमांचे काटेकोर पालन करून बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत निर्देश..